दि.१ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची या वर्षीच जन्मशताब्दी वर्ष आपण साजर करत असून याच अवचित्य साधून त्यांना भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्काराने भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात याव अशा मागणीच निवेदन आज उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी दारव्हा यांच्या मार्फत विद्यमान मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांना देण्यात आलं.
साहित्यसम्राट लोकशाहीर स्व. श्री. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी लौकिक आणि मराठी मुलुखाची पताका साता समुद्रापार नेण्यात फार मोठ योगदान दिल आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम मधे लोकशाहीर यांनी आपल्या प्रबोधन आणि लोकजागर उपक्रमातुन शेतकरी, कष्टकरी, कामगार यांना चळवळीत मोठा वाट निभावला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लोक वांग्मय,कथा,कादंबरी,लोकनाट्य,गाणी,नाटक,पटकथा,पोवाडे,लावण्या, इ. लिखाण आणि समाज प्रबोधिनाची अफाट शैली ही महाराष्ट्राची मान उंचावणारी आहे. आशा लोक सेवकास मरणोत्तर भारतरत्न जाहीर करावा अशी तमाम महाराष्ट्र वासियांची अभिलाषा मा. मुख्यमंत्र्यांनी शिफारस करून केंद्र शासना कडे पाठवावा म्हणून दारव्हा तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेकडून करण्यात आला या पार्श्वभूमी वर लोकशाहीर साहित्य परिषद, संभाजी ब्रिगेड, लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटने कडून संयुक्त निवेदन देण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष शिवश्री. अमोलदादा पावडे पाटील, लोकशाहीर साहित्य परिषदे चे श्री अक्षयभाऊ तेलंगे, लहुजी शक्ती सेनेचे श्री रविभाऊ खडसे, संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष शिवश्री. अनिल मोहिते पाटील, मोहनराव झोंबाडे, गोपाल गायकवाड, रोहित भाऊ राठोड, अमोल भाऊ इंगळे, इकबाल शेख, शोएब शेख, ईश्वर तेलंगे इ. पदाधिकारी उपस्थित होते.
















